या सभेमध्ये लढ्याचा कार्यक्रम ठरवला गेला व पुढील मागण्या मांडण्यात् आल्या..
(1) भाडे नियंत्रण कायदा रद्द कर्ण्याची कारस्थाने बंद करा
(2)चाळीच्या, झोपड्यांच्या पुर्नविकासाठी 70% संमतिची अट कायम ठेवावी.
(3) झोपड्यांवरील प्राॅपर्टी टॅक्स रद्द करावा.
(4) मैदाने, मोकळ्या जागा,खेळाची मैदाने ईत्यादी देखभाल, मेन्टेनन्स, केअरटेकर या विवीध नावखाली खाजगी संस्थाना देण्याची कलमे रद्द् करावीत.
(5) म्हाडा संकुलाचा पुर्नविकास म्हाडातर्फेच करावा
(6) बिल्डर्सना संमति मिळाल्यापासून तीन वर्षात विकासाचे पाऊल ऊचलले नाही तर बिल्डरची NOC रद्द करून म्हाडाने प्राॅपेर्टी AQUIRE करून म्हाडातर्फेच विकास करावा
(7) म्हाडामध्ये ट्रानझिट मध्ये राहात असलेल्या रहिवासांची प्रस्थावित भाडेवाढ 500 रूपयांवरून 3100 रूपयांवर नेण्याचा भाढेवाढ प्रस्ताव रद्द करा.
(8)वरळीगाव व ईतर कोळीवाड्यांना झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याचे कारस्थान बंद करा
या व ईतर मागण्यासांठी बृहनमुंबई भाडेकरू परिषदेतर्फे मुंबईत किमान 100 सभा घेण्यात येऊन सह्यांची मोहीम करण्यात येईल व फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र विधानभवनावर भव्य मोर्च्या काढण्यात येईल.
(28/01/2016)
Friday, January 29, 2016
बृहनमुंबई भाडेकरू परिषदेची 'एल्गार सभा'
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment